शेतकऱ्यांना ऊस सर्वेक्षणात मिळणार सुधारणा करण्याची संधी

हल्दौर, उत्तर प्रदेश: ऊस विकास परिषद आणि बालाई साखर कारखान्याच्यावतीने उसाच्या सर्व्हेनंतर ग्रामीण स्तरावर २० जुलैपासून प्रदर्शनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षकांनी शेतकऱ्यांना ऊस सर्व्हेच्या प्रदर्शनावेळी उपस्थित राहून त्यात सुधारणा करण्याची संधी असल्याचे सांगितले आहे.

ऊस विकास परिषद बिलाईचे ज्येष्ठ निरीक्षक अमित पांडे यांनी सांगितले की, साखर कारखाना आणि ऊस विकास परिषदेच्यावतीने संयुक्त रुपात ऊस सर्व्हेनंतर ग्रामीण स्तरावर २० जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ऊस विकास परिषदेच्या तीस टीम सर्व्हेचे प्रदर्शन करतील. विभागीय स्तरावर शेतकऱ्यांनी यामध्ये सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित राहून आपल्या सर्व्हेची माहिती तपासावी. त्यात सुधारणा करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यात बदलाची संधी मिळणार नाही.

त्यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन घोषणापत्र भरलेले नाही, त्यांनी तातडीने ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावी. त्याशिवाय तोडणीची प्रक्रिया केली जाणार नाही.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here