कोल्हापूर : जयसिंगपूर येथे मंगळवारी सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झालेल्या २२ व्या ऊस परिषदेवेळी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाची पुढील वाटचाल स्पष्ट केली. ऊस दरासाठीच्या आक्रोश पदयात्रेनंतर आता शेट्टी यांनी दिवाळीत उपोषण करण्याची घोषणा केली आहे.
दिवाळीतील अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी घरातून कांदा-भाकरी आणून साखर कारखान्यांच्या अध्यक्षांना द्यावी. त्यांना ऊस उत्पादकांच्या व्यथा सांगाव्यात. मी आजपासून दिवाळीला घरी जाणार नाही. परिषदेच्या आंदोलनस्थळी १६ नोव्हेंबरपर्यंत उपोषण करणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली जाईल.