आकडे बोलतात; अतिरिक्त साखरेचे संकट आणखी गडद

नवी दिल्लीचीनी मंडी

ब्राझीलला मागे टाकत भारत आता जगातील सर्वांत मोठा साखर उत्पादक देश होण्याच्या मार्गावर आहेमात्रदेशातील साखर उद्योगापुढे सर्वांत मोठे आव्हान उभे आहेमावळत्याहंगामात देशात ९८ ते १०० लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे.

भारताने गेल्या २०१७१८च्या हंगामात ३२० लाख टन साखर उत्पादन करून उच्चांक प्रस्थापित केलायेत्या २०१८१९च्या हंगामात भारतात ३५० ते ३५५ लाख टन साखरेचेउत्पादन होण्याचा अंदाज आहेयामुळे भारत ब्राझीलसारख्या देशाला साखर उत्पादनात मागे टाकणार आहे.

देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचा घसरलेला दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही फारशी समाधानकारक स्थिती नसल्यामुळे भारतात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे भागवण्याचीसर्वांत मोठी समस्या आहेघटलेली मागणी आणि अतिरिक्त साठ्यामुळे साखर उद्योगात चिंतेचे वातावरण आहे.

ऑगस्ट महिन्यापर्यंत देशातील साखरेची झालेली २३० ते २३२ लाख टन विक्री आणि या महिन्याच्या अखेरपर्यंत होणारी २० लाख टन संभाव्य विक्री गृहित धरलीतर या हंगामात२५० ते २५२ लाख टन साखर विक्री होणार आहेत्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच भारताकडे तब्बल ९८ ते १०० लाख टन साखर शिल्लक असणार आहेया साखरेचा बोजाघेऊनच पुढच्या हंगामाला सुरुवात होणार असल्याने या अतिरिक्त साखरेच्या संकटातून बाहेर कसे पडावेअसा प्रश्न साखर उद्योगातील प्रत्येकापुढे आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here