बांग्लादेशात पुरामुळे ऊस पीकाचे नुकसान

ढाका : जमालपूर मध्ये पुरामुळे एकूण 1,90,027 शेतकर्‍यांचे ऊसासह इतर पीकांमध्ये टीके140 करोड रुपयांचे नुकसान झाले आहे. यावर्षी अनेक टप्प्यांमध्ये जमालपूरमध्ये आलेल्या पुरामुळे पीकांचे मोठे नुकसान झाले, यामुळे हजारो शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. यावर्षी एक महिन्यापासून अधिक काळापर्यंत तशाच राहिलेल्या पुरस्थितीने जिल्ह्यातील सात उपजिल्हा क्षेत्रामध्ये शेतीचे मोठे नुकसान केले आहे. अधिकृत माहितीनुसार, इस्लामपूर, दीवानगंज, मदारगंज सह 7 उपजिल्ह्यातील 59 यूनियन पैकी 677 गावात ऊस , जूट, भाज्या, मिरची, केळी, तिळ, काजू सह इतर पीकांचे एकूण 26,206 हेक्टर पीकाचे नुकसान झाले आहे. ज्यामध्ये 15,492 हेक्टर पूर्णपणे नुकसानग्रस्त झाले आहे आणि उर्वरीत 10,714 हेक्टर आंशिक रुपाने नुकसानग्रस्त झाले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here