पुराचा फटका : नऊपैकी फक्त एकच साखर कारखाना सुरू

लखीमपुरखीरी : जिल्ह्यात वीस दिवसांपूर्वी आलेल्या पुराचे पाणी ओसरल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराचा परिणाम जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावरही झाला आहे. जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांपैकी फक्त अजवापूर कारखान्याचे गाळप सुरू आहे. उर्वरीत आठ कारखाने अद्याप सुरू होऊ शकलेले नाहीत. कुंभी साखर कारखाना आता सुरु होईल. ऐरा आणि पलिया कारखाने खूप उशीरा सुरू होतील. पाण्यामुळे ऊस कारखान्यापर्यंत पोहोचणे अवघड बनले आहे. पाण्यामुळे उसाची तोडणी झालेली नाही.
जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांपैकी दोन सहकारी कारखाने असून उर्वरीत सात कारखाने खासगी आहेत. खिरी जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी ऊस शेती करतात. जिल्ह्यात वीस दिवसांपूर्वी आलेल्या पुरात खूप नुकसान झाले आहे. भाताचे पिक पुरात बुडाले तर उसालाही फटका बसला. त्यामुळे नऊपैकी एकच कारखाना सुरू आहे. जिल्हा ऊस अधिकारी बृजेश पटेल यांनी सांगितले की, कुंभी साखर कारखाना आता सुरू होईल. उर्वरीत सर्व कारखाने उशीरा सुरू होतील. पलिया आणि ऐरा कारखाने उशीरा गाळप सुरू करतील.

दरम्यान, पुराच्या पाण्यात पडलेला ऊस शेतकरी तोडून क्रशरला कमी दरात विकत आहेत. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारखाने लवकरात लवकर सुरू व्हावेत यासाठी व्यवस्थापनाशी संपर्क सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here