चांगल्या पावसाच्या अनुमानामुळे अन्नधान्याच्या किमती कमी होण्याची शक्यता : सरकार

नवी दिल्ली : यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पावसानंतर उत्पादन चांगले होऊन अन्नधान्याच्या किमती कमी होतील, असे अर्थ मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या मासिक आर्थिक आढाव्यात म्हटले आहे. भारताच्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने (IMD) सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे भाकीत केले आहे.

भारतातील अन्नधान्य महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये 8.7 टक्क्यांवरून घसरला आहे. महत्त्वाच्या खाद्यपदार्थांच्या बफरला बळकट करण्यासाठी आणि त्यांना वेळोवेळी खुल्या बाजारात सोडण्यासाठी आवश्यक खाद्यपदार्थांची आयात केली गेली आहे आणि नेमलेल्या किरकोळ दुकानांद्वारे पुरवठा केला गेला आहे.

डाळ आयात करण्यासाठी सरकार ब्राझील आणि अर्जेंटिनासारख्या नवीन बाजारांशी चर्चा करत आहे, सरकारी सूत्रांनी यापूर्वी ‘एएनआय’ला सांगितले होते की, ब्राझीलमधून 20,000 टन उडीद आयात केले जाईल. सरकारने डाळींच्या आयातीसाठी मोझांबिक, टांझानिया आणि म्यानमार यांच्याशी करार केला आहे.

भाजीपाल्याच्या संदर्भात, CRISIL च्या अलीकडील अहवालात असे सूचित केले आहे की जूननंतर भाजीपाल्यांच्या किमती कमी होतील. IMD ने 2024 मध्ये सामान्यपेक्षा जास्त नैऋत्य मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. हे भाजीपाल्याच्या किमतींसाठी चांगले आहे, परंतु मान्सूनचे वितरण देखील महत्त्वाचे आहे, जूनपर्यंत सामान्य तापमानापेक्षा जास्त असेल, ज्यामुळे पुढील काही महिने भाजीपाल्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here