पूरग्रस्त शेतकऱ्यांना अपुऱ्या मदतीविरोधात माजी खासदार शेट्टी करणार आंदोलन

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने महापूराने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत दिली आहे. त्यामुळे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

पत्रकारांशी बोलताना माजी खासदार शेट्टी म्हणाले, तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार २०१५ मधील शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना मदत देत आहे. मात्र या शासकीय अध्यादेशातील तरतुदी अपुऱ्या आहेत. या जीआरनुसार खरीप पिके आणि नुकसान झालेल्या उसासाठी अनुक्रमे ६८ रुपये प्रती गुंठा आणि १३५ रुपये प्रती गुंठा इतक्या कमी मदतीची तरतुद आहे. खरेतर सरकारने पूर रोखण्यासाठी तरतुदी करण्याची गरज आहे. शेट्टी यांनी केलेल्या इतर मागण्यांमध्ये पिक कर्ज आणि पुराचा फटका बसलेल्या भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करण्याची मागणी केली. याबाबत २३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here