मेरठ जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी भागवली थकबाकी

मेरठ: जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी बुधवारी 64.40 करोड रुपयांची ऊस थकबाकी भागवली. मेरठमध्ये सहा साखर कारखान्यांवर एकूण 2637.75 करोड रुपये देय आहेत. त्यापैकी जवळपास 62 टक्के ऊसाचे पैसे भागवण्यात आले आहेत. जिल्हा ऊस अधिकारी डॉ.दुष्यंत कुमार यांनी सांगितले की, बुधवारी मवाना साखर कारखान्याने 31.75 करोड, नंगलामल ने 25.25 करोड, सकौती ने 4.35 करोड व किनौनी कारखान्याने 3.05 करोड रुपयांची बाकी भागवली आहे. सर्व एडवाइज ऊस समित्यांकडून संबंधित बँकांना पाठवण्यात येत आहेत. ज्यामुळे लवकरच ऊस शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये थकबाकी जमा होईल. बुधवारी थकबाकी भागवलेल्या सर्व साखर कारखान्यांवर शेतकर्‍यांचे अजूनही जवळपास 960 करोड रुपये बाकी आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here