पाकिस्तान : चार साखर कारखाने बंद होण्याच्या मार्गावर

सरगोधा : पाकिस्तानातील सरगोधा चे डेप्यूटी कमिश्‍नर अद्बुल्ला नय्यर शेख यांनी सरगोधा जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांच्या मालकांना लवकरात लवकर गाळप सुरु करा, अन्यथा कारखाने बंद करण्यात येतील, असे आदेश दिले आहेत.

डेप्यूटी कमिश्‍नर यांनी ऊस शेतकर्‍यांना साखर कारखान्यांच्या गेटवर ऊस उपलब्ध करण्यासाठी जोर दिला आहे. तर डीसी यांनी जिल्ह्यामध्ये कमी ऊस लागवडीबाबत माहिती घेण्यासाठी कारखाने, प्रशासन आणि ऊस शेतकर्‍यांमधील एक एक सदस्यांचा समावेश करुन एक फैक्ट फाइंडिंग समिती गठीत केली आहे.

गाळप हंगामासंदर्भात झालेल्या एका बैठक़ीवेळी बोलताना शेख बोलत होते. ज्यामध्ये एडीसीआर शोएब अली, एडीसीजी बिलाला फिरोेज, सहायक आयुक्त, शेतकरी इत्तेंहाद आणि कारखाना प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.  त्यांनी अल अरबिया कारखान्याच्या प्रशासनाला एका आठवड्यात ऊस शेतकर्‍यांची थकबाकी भागवण्याचे निर्देश दिले आणि कार्यालयाला एक अहवालही दिला की, शेतकर्‍यांचे शोषण आता सहन केले जाणार नाही. तसेच बँकांच्या माध्यमातून थकबाकी देण्याचे निश्‍चित करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here