हप्त्यामध्ये एफआरपी: माजी खासदार शेट्टींची ऊस उत्पादकांसाठी ‘मिस्ड कॉल’योजना

कोल्हापूर : प्रस्तावित एफआरपी हप्त्यामध्ये देण्याच्या निर्णयाविरोधात स्वाभीमानी शेतकरी संघटनेने राज्यातील ऊस उत्पादकांना एकजूट दर्शविण्यासाठी मिस्ड कॉल अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना हप्त्यामध्ये एफआरपीच्या निर्णयाबाबत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. जर शेतकऱ्यांना एकदम पैसे मिळाले, तर ते बँकांतील कर्जे भागवू शकतात. आणि पुढील हंगामाची तयारी करतात असे शेट्टी म्हणाले.

अलिकडेच नीती आयोगाने केंद्र सरकारला तीन हप्त्यांमध्ये एफआरपी देण्याची शिफारस केली होती. पहिल्या चौदा दिवसात ६० टक्के ऊस बिले, त्यानंतर दोन आठवड्यात उर्वरीत २० टक्के आणि एक महिन्यानंतर २० टक्के रक्कम असा हप्ता देण्याची शिफारस केली होती. शेट्टी म्हणाले, राज्य सरकारनेही एफआरपी हप्त्यामध्ये देण्याबाबत शिफारस केल्याचे ऐकून आश्चर्य वाटले.

टाइम्स ऑफ इंडियात प्रकाशित वृत्तानुसार हप्त्यामध्ये एफआरपीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल. बहुतांश कारखान्यांचे खाजगीकरण होत आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या बाजूने विचार करत आहे. आम्ही एक मोबाईल क्रमांक दिला आहे. शेतकऱ्यांना सरकारच्या या निर्णयाविरोधात मिस्ड कॉल देऊन आम्हाला पाठिंबा द्यावा. आम्ही विरोधातील शेतकऱ्यांचा डाटा घेऊन केंद्र सरकारकडे जाणार आहोत. हप्त्यात एफआरपीचा प्रस्ताव पुढे नेऊ देणार नाही. शेट्टी यांनी आगामी गळीत हंगामात एफआरपी वाढीबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत केंद्र सरकारवर टीका केली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here