गंगामाई साखर कारखान्याचे 12 लाख टन ऊस गाळपाचे ध्येय

शेवगाव, अहमदनगर: गंगामाई साखर कारखान्याचे अध्यक्ष पद्माकर मुळे यांनी सांगितले की, कारखान्याने 2020-2021 च्या हंगामामध्ये 12 लाख टन ऊस गाळपाचे ध्येय ठेवले आहे. त्यांनी सांगितले की, कारखाना क्षेत्रातील सर्व ऊस गाळप निश्‍चित वेळेत करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने तयारी पूर्ण केली आहे. व्यवस्थापन ऊस शेतकर्‍यांना चांगला दर देण्यासाठी कटीबद्ध आहेत. त्यांनी सांगितले की, कारखान्याने नेहमीच शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे.

कारखान्याच्या 10 व्या गाळप हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन चीफ फायनान्सशीयल अकांउंटंट वी.एस. खेंडेकर आणि त्यांच्या पत्नी द्वारकाताई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पद्माकर मुळे, कार्यकारी संचालक रणजीत मुळे, संचालक समीर मुळे, संदीप सातपुते, एस.एन. थिटे आदी उपस्थित होते. अध्यक्ष मुळे यांनी सांगितले की, कोरोना अवधी दरम्यान, कामगार आणि अधिकार्‍यांनी गाळपाची तयारी करण्यासाठी परीश्रम घेतले आहेत. यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे ऊसाचे क्षेत्रफळ चांगले आहे. त्यांनी सांगितले की, साखरेबरोबर इथेनॉल उत्पादन वाढवण्यावर जोर दिला जाईल. त्यांनी शेतकरी, ऊस मजुर आणि कारखाना कर्मचारी यांना गाळप यशस्वी होण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here