शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले द्या : ऊस मंत्री लक्ष्मी नारायण

मुरादाबाद : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले द्यावीत, असे निर्देश उत्तर प्रदेशचे ऊस मंत्री लक्ष्मी नारायण यांनी दिले. मुरादाबाद विभागाच्या आढाव्यात ऊस उपायुक्त सरदार हरपाल सिंग यांनी साखर कारखान्यांनी आतापर्यंत ९२ टक्के ऊस बिले दिली आहेत, अशी माहिती दिली. सर्किट हाऊसवर झालेल्या बैठकीदरम्यान ऊस मंत्री लक्ष्मी नारायण म्हणाले की, राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सरकारने सुविधा वाढवल्या आहेत.

मंत्री लक्ष्मी नारायण म्हणाले की, पूर्वीच्या सरकारांमध्ये उसाच्या बिलांची स्थिती अत्यंत बिकट होती. मात्र आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिले जात आहेत. शेतकऱ्यांना विभागीय योजनांचा पूर्ण लाभ मिळावा, असे त्यांनी ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. जनजागृती मोहिमाही सुरू ठेवा अशी सूचना त्यांनी केली. यावेळी जिल्हा ऊस अधिकारी राम किशन व इतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here