संजीवनी साखर कारखाना नोव्हेंबरपासून सुरु होणार; मंत्री गौड यांचे आश्‍वासन

गोव्यातील बंद पडलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना नोव्हेंबरपासून सुरु होईल, असे अश्‍वासन सहकारमंत्री गोविंद गौड यांनी कारखान्यातील कर्मचार्‍यांना दिले.
मंगळवारी गोविंद गौडा यांनी साखर कारखान्याची पाहणी केली. उसाची अनुपलब्धता आणि इतर कारणांमुळे कारखान्याचे 101.22 करोड रुपयाचे नुकसान झाले आहे. या कारखान्याला सुरु ठेवण्यासंदर्भातील व्यवहार्यता तपासून याबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल.
गौड म्हणाले, सरकार उस शेतकर्‍यांचे कोणतेही नुकसान या हंमागात होवू देणार नाही. हा कारखाना सुरु होण्याच्या दृष्टीने शक्य तितके प्रयत्न सरकार करेल. याबरोबरच सरकार उस शेतकर्‍यांना समर्थन मूल्यही देईल. शिवाय त्यांचा उस खरेदी करुन इतर राज्यांना देण्यात येईल.
हा कारखाना बंद पडल्यास पंजिमच्या रस्त्यावर शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा स्थानिक राजकीय नेत्यांनी सरकारला दिला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here