कारखान्यांना इंडोनेशियामध्ये साखर निर्यातीची सुवर्णसंधी

नवी दिल्ली : भारताच्या साखर कारखान्यांच्या साखर निर्यातीसाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतीय साखर कारखाने इंडोनेशिया ला कच्ची साखर आयात करु शकतात. इंडोनेशिया कडून भारताच्या कच्च्या साखरेच्या आयातीला सक्षम करण्यासाठी आपल्या गुणवत्तेच्या मनदंडांमध्ये परिवर्तन होण्याची शक्यता आहे.
सध्या या हंगामात इंडोनेशिया ला कमीत कमी 35 लाख टन कच्च्या साखरेची आवश्यकता आहे, जी भारतीय साखर कारखान्यांसाठी नवी संधी घेवून आली आहे.

इंडोनेशिया साखरेची आयात करतो, ज्यामध्ये ईक्कुंसा चा स्तर 1,200 इतका किंवा त्यापेक्षाही जास्त आहे. ते केवळ कच्च्या साखरेची आयात करतात, ज्यामध्ये साधारणपणे ईक्कुंसा चा स्तर सर्वात अधिक असतो, आणि भारताची सर्वात चांगली गुणवत्ता असणारी कच्ची साखरही या आयात मानदंडांना पूर्ण करत नाही. ईक्कुंसा च्या प्रमाणाला 500 पासून 600 पर्यंत केले जावू शकते. यावर औपचारिक घोषण लवकरच होण्याची शक्यता आहे.

इंडोनेशिया थाईलंड कडून साखर आयात करतो, ज्यात ईक्कुंसा प्रमाण अधिक आहे. थाइलंड मध्ये यावर्षी दुष्काळ पडला आहे आणि थायलंड आपल्या घरगुती आवश्यकतांना पूर्ण करु शकलेला नाही. ब्राजीलचा हंगाम अजून सुरु झालेला नाही. ज्यामुळे भारत आता एकटाच साखर पुरवठा करणारा देश आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here