इथेनॉल उत्पादनासाठी सरकारचे कारखान्यांना प्रोत्साहन: साखर आयुक्त

रुडकी : ऊस विकास समिती आणि ऊस परिषदेची पाहणी करण्यासाठी आलेल्या ऊस तथा साखर आयुक्त हंसादत्त पांडे यांनी सांगितले की, साखर कारखान्यांना साखरेसह इथेनॉल उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनासाठी कर्ज घेत असतील तर सरकार ५० टक्के व्याज देईल. राज्यात मागणीपेक्षा अधिक साखर उत्पादन पाहता सरकार इथेनॉल प्लांटवर अधिक जोर देत आहे.

ऊस तथा साखर आयुक्तांनी ऊस विकास समितीच्या लक्सर आणि ऊस परिषदेची पाहणी केली. त्यादरम्यान त्यांनी सांगितले की, ऊसाचे पैसे देणे आणि साखर उतारा यामध्ये हरिद्वारची स्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगली आहे. त्यामुळे या सत्रामध्ये येथे ऊसाच्या क्षेत्रात पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात साखरेचे उत्पादन मागणीच्या दुप्पट आहे. त्यामुळे कारखान्यांना साखर विक्रीत अडचणी येत आहे.

त्यामुळे सरकार साखर कारखान्यांना साखरेसोबत इथेनॉल उत्पादनावर भर देण्यास सांगत आहे. इथेनॉल उत्पादनासाठी सरकार मदत करेल. जर कारखाने यासाठी बँकेकडून कर्ज घेणार असतील तर त्याचे ५० टक्के व्याज सरकार अनुदान म्हणून देईल. हरिद्वार जिल्ह्यात लिब्बरहेडी आणि लक्सर कारखान्यात इथेनॉल प्लांट सुरू झाले आहेत. इकबालपूर कारखान्यालाही यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यादरम्यान, जिल्हा ऊस अधिकारी शैलेंद्र सिंह, एससीडीआय प्रदीप वर्मा, ऊस परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र सिंह, जितेंद्र नागर, प्रभारी सचिव गौतम नेगी आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here