महाराष्ट्र सरकारने दिली दोन साखर कारखान्यांना कर्ज हमी

मुंबई : महाराष्ट्र सरकारने दोन साखर कारखान्यांच्या २८ कोटी रुपयांच्या कर्जासाठी हमी दिली आहे. दी टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार सरकारने पुण्याच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला १० कोटी रुपये आणि पंढरपूरच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याच्या १८ कोटींच्या कर्जाला सरकारने हमी दिली आहे.
ही कर्ज थकहमी एक वर्षासाठी वाढविण्यात आली आहे. साखर कारखाने ऑक्टोबर महिन्यात गळीत हंगामाआधी मशीन दुरुस्ती, तोडणी आणि वाहतुकीच्या खर्चासाठी कामगारांना अॅडव्हान्स देण्यासाठी हंगामापूर्वी कर्ज घेतात.

सरकारने सांगितले की, नाबार्डकडून नवे अधिनियम लागू झाल्यानंतर सहकारी साखर कारखान्यांना सहकारी बँकांकडून कर्ज घेणे अडचणीचे झाले होते. गेल्यावर्षी ३२ पैकी फक्त सात कारखान्यांनी सरकारने दिलेल्या हमीचा लाभ उचलला होता.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here