महाराष्ट्र सरकारने साखर उद्योगाच्या मुद्यांवर घेतली बैठक

मुंबई: महाराष्ट्राच्या साखर उद्योगाची आर्थिक स्थिती अधिक प्रगतीच्या मार्गावर घेवून जाण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या संबंधामध्ये बैठका सुरु आहेत.

महाराष्ट्रामध्ये सहकार विभागाने गुरुवारी बैठक घेतली ज्यामध्ये साखर उद्योगाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठक़ीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले की, विशेष करुन साखर कारखान्यांच्या इथेनॉल प्रकल्पाना आर्थिक सहकार्यावर बैठक़ीमध्ये चर्चा झाली. बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि जल संपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. तसेच नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अ‍ॅन्ड रुरल डेवलपमेंट (नाबार्ड), स्टेट को ऑपरेटिव बँकेचे अधिकारी आणि साखर यूनियनचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

बैठक़ीबाबत शरद पवार यांनी ट्वीटर वरही माहिती दिली. त्यांनी ट्वीट करुन सांगितले की, आम्ही मुख्यपणे बैठक़ीमध्ये तीन मुद्यांवर चर्चा केली. इथेनॉल प्रकल्पांसाठी आर्थिक सहकार्य, साखर कारखान्यांना आर्थिक सहकार्य आणि कर्जाचे पुर्नगठन यावर चर्चा झाली.

माजी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी बैठक़ी दरम्यान नाबार्ड च्या अधिकार्‍यांना राज्यामध्ये साखर उद्योग सामना करत असलेल्या संकटाला निपटवण्यासाठी सर्व मुद्दयांची तपासणी करण्याबाबतच्या त्यांच्या अश्‍वासनासाठी धन्यवाद दिले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here