साखर कारखान्यांना होणार आता राज्य शासनाची मदत

नागपूर : साखर कारखान्यांच्या आर्थिक अवस्थेसंदर्भात अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहे. कारखान्यांना यातून बाहेर काढून साखर उद्योगाला पुनरुज्जीवीत करण्यासाठी कार्यक्षम कारखान्यांना मदत करण्याचे काम राज्यशासन करणार आहे. आर्थिक संकटात असलेल्या कारखान्यांची पुनर्रचना करण्याचा विचार सुरू आहे, असे सहकार मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

विधानपरिषदेत सदस्य सदाशिव खोत यांनी साखर कारखान्यांच्या एफआरपी संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, राज्यातील साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांना थकित एफआरपीची रक्कम देण्यासंदर्भात साखर आयुक्तांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. उर्वरित थकीत रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री रामराव पाटील, सुरजितसिंह ठाकूर आदींनी सहभाग घेतला

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here