औद्योगिक काम सुरू झाल्यावर प्रवासी श्रमिकांना पुन्हा परत आणण्यात सरकार करणार मदत

नवी दिल्ली: औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्राला शिथिलता दिल्याने उद्योगाचे चक्र पुन्हा सुरु होत आहेत. अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, अशा स्थितीमध्ये आपल्या गावाकडे गेलेल्या मजुरांना केंद्र सरकार पुन्हा त्याच शहरात आपापल्या कामावर परतण्यासाठी योजना बनवणार आहे.

त्यांनी सांगितले की, अशा संकटात आम्ही कंपनी आणि त्या प्रवाशांसोबत मिळून काम करु, जे पुन्हा परतणार आहेत. या समस्येच्या निराकरणासाठी सरकार सर्व प्रकारे प्रयत्न करेल. पुढे जाऊन केंद्र, राज्य आणि कंपनी कडून खूप काम करायचे आहे. त्या म्हणाल्या, कोरोनाच्या नकारात्मक प्रभावातून बाहेर येण्यासाठी सरकारच्या 20 लाख करोड़ रुपयाच्या आर्थिक प्रोत्साहन पकेजचा चांगला परिणाम होईल. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत योजनेचा उद्देश भारतीय कंपन्यांना जागतिक स्तरावर प्रतिस्पर्धी बनवणे हा आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here