आत्मनिर्भर भारत: केंद्र सरकार ची 2022 पर्यंत कृषि निर्यात दुप्पट करण्याची योजना

नवी दिल्ली: ‘आत्मनिर्भर भारत’ च्या अनुरूप, भारताचे 2022 पर्यंत कृषि निर्यातीच्या ध्येयाला US$30 बिलियन पासून US$60 बिलियन पर्यंत दुप्पट करायचे आहे. तसेच कोरोना वायरस महामारी नंतर नवा बाजार शोधायचा आहे. यामुळे कृषि क्षेत्रामध्ये चीन लाही टक्कर दिली जाऊ शकेल.

कृषि मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिका,कॅनडा , चिली, इक्वाडोर, दक्षिण कोरिया, मलेशिया, ईरान आणि चीन बरोबर त्याचे प्रतिस्पपर्धी ताइवान ला अधिक निर्यात करण्यााची भारताला संधी आहे. कृषि क्षेत्राला उदार बनवण्यासाठी या तीन अध्यादेशांना लागू केल्यानंतर नव्या बाजारा पर्यंत पोचणे आणि निर्यात वाढवण्याची वेळ आली आहे. भारत एक कृषि महाशक्ति आहे आणि जास्तीत जास्त निर्यात शेती उत्पन्नाला दुप्पट करण्यात मदत करु शकते, ज्यामुळे पीएम द्वारा निर्धारित लक्ष्य पूर्ण होऊ शकते.

अधिकाऱ्यांनी 11 कृषि-आधारित वस्तूंची ओळख पटवली आहे, ज्या चीन अन्य व्यापारि भागीदारांकडू आयात करतो, ज्या निर्यात करण्याची क्षमता भारताकडे आहे. या वस्तु ना “चीन ला संभावित निर्यात” श्रेणी मध्ये ठेवण्यात येईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here