पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया प्रोजेक्टशी सरकारने ऊस बिले जोडावीत : राकेश टिकैत

बागपत : केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणारे उसाची बिले देण्याची प्रक्रिया डिजिटल इंडिया प्रोजेक्टशी जोडली जावी अशी मागणी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्त राकेश टिकैत यांनी केली आहे. भाकियू प्रवक्ते टिकैत यांनी सांगितले की, जर डिजिटल इंडियाअंतर्गत देशातील प्रत्येक्ष क्षेत्र आणि प्रत्येक घटक जोडण्याची भाषा केली जात असेल तर यापासून शेतकऱ्यांना वेगळे का ठेवले गेले आहे. आगामी काळात या प्रश्नासाठी एक मोठे आंदोलन उभारले जाईल. शेतकऱ्यांची ऊस बिले डिजिटल इंडियाशी जोडण्याची मागणी त्यांनी उपस्थित केली आहे.

पत्रिका डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी बागपतमध्ये केंद्र सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, केंद्र सरकार शेतकरी हिताची कामे करीत असल्याचे सांगते. मात्र, तशा प्रकारची कृती केली जात नाही. विंधन विहिरींवर जबरदस्तीने वीज मीटर लावले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचे शोषण करीत आहे. खरेतर शेतकऱ्यांच्या ऊस बिलांना पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया पायलट प्रोजेक्टशी जोडले जायला हवे. शेतकऱ्यांना सध्या ऊस बिले वेळेवर मिळत नाही. ऊस बिले वेळेवर मिळण्याबाबतच्या अधिनियमाचे पालन केले जात नाही. सरकारने ऊस बिले डिजिटल इंडियाशी जोडल्यास शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाचे पैसे मिळू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here