केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातुन साखर कारखाना पुनरुर्जिवित करण्याचा आग्रह

पोंडा: गोव्याचे माजी पीडब्ल्यूडी मंत्री आणि आमदार सुदीन ढवळीकर यांनी सरकारकडून केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून संजीवनी साखर कारखाना पुनर्जिवित करण्याचा आग्रह केला, ज्या योजनेमध्ये 60 करोड रुपयाच्या निधीचे नियोजन केले आहे.

आमदार ढवळीकर म्हणाले, त्यांनी 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या बरोबर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, तत्कालीन कृषी मंत्री विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत या योजनेला कृषी विभागाअंतर्गत आणण्याबाबत चर्चा केली होती. जेणेकरुन केंद्र सरकारच्या योजनांचे सर्व लाभ मिळू शकतील.
ढवळीकर म्हणाले, या सरकारच्या योजनेअंतर्गत संजीवनी चा पुनरुद्धार करण्यासाठी 60 करोड रुपये मिळू शकतात. आणि याप्रकारे शेतकर्‍यांसाठी पुन्हा एकदा कारखाना सुरु केला जावू शकतो. आणि त्यांना ऊस उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहित केले गेले पाहिजे. सहकार मंत्री यांच्यावर निष्क्रीयतेचा आरोप करुन त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आव्हान केले. ढवळीकर म्हणाले, सहकार मंत्र्यांच्या अक्षमतेसाठी, शेवटी लोक मुख्यमंत्र्यांनाच दोष देणार.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here