सोलापूर : यंदाच्या गळीत हंगामासाठी सोलापूर विभागातील सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. यापैकी २२ कारखान्यांना आतापर्यंत परवाना देण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात यंदा २.५ लाख हेक्टर ऊसाची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा हा हंगाम किमान सहा महिने चालेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यात उसाचे क्षेत्र कमी झाले आहे.
गाळप हंगामाच्या परवान्यासाठी इच्छुक असलेल्या कारखान्यांची संख्या पाहता यंदाचा हंगाम चांगला राहील अशी शक्यता आहे. मात्र, साखर आयुक्तांकडून किती कारखान्यांना परवाना दिला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. गेल्या हंगामात सोलापूर जिल्ह्यात १.५ लाख हेक्टर ऊस होता. आणि ३१ कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग नोंदवला होता. मात्र, यंदा किती ऊस उपलब्ध आहे, यावर हा हंगाम किती काळ चालेल हाचा आडाखा ठरणार आहे.