महाराष्ट्रात नऊ साखर कारखान्यांचे गाळप सुरू

पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात ६ मे २०२१ अखेर १८१ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर फक्त नऊ कारखान्यांचे गाळप सुरू आहे.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, ६ मे २०२१ अखेर १९० साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता. राज्यात १००९.८४ लाख टन उसाचे गाळप करून १०५९.७२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४९ टक्के इतका आहे.

साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, सोलापूर विभागात ४३ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ३७ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे. नांदेड विभागातील २६ कारखाने बंद झाले असून पुणे विभागातील २९ कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपला आहे. अहमदनगरमधील २३ कारखाने बंद झाले असून औरंगाबादमधील १८ तर अमरावतीलमधील २ कारखाने बंद झाले आहे. नागपूरमधील ३ कारखानेही बंद झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here