मारगोवा(गोवा): गोव्यातील एक मात्र साखर कारखाना संजीवनी च्या वादावर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याबाबत शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटण्याच्या प्रतिक्षेत आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, कारखाना बंद करण्याच्या निर्णयापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी संवाद साधावा. राज्यातील ऊस शेतकऱ्यांनी धर्मबंधोरा येथील संजीवनी कारखाना बंद करण्याच्या सरकारच्या प्रस्तावावर नाराजी दाखवली आहे.
ऊस शेतकऱ्यांची अलीकडेच सुंगम च्या वाडेम मध्ये बैठक झाली. या बैठकीत सांगितले, संजीवनी साखर कारखान्याचे मॉडेल सहकारी मॉडेल होते. यामध्ये शेअर धारकांचा सहकारी निर्णय गरजेचा आहे. कारखान्या विरोधात एकतर्फी निर्णय स्विकारला जाणार नाही.
या दरम्यान, राज्यातील भाजप ने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना संजीवनी साखर कारखान्याबाबत निर्णय घेताना शेतकऱ्यांचे हित लक्षात घ्यावे, अशी विनंती केली.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.