हरियाणा : ऊस दर वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी

रोहटक : भाली साखर कारखान्याच्या ऊस समितीची बैठक साखर कारखान्याच्या आवारात झाली. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. आगामी काळात उसाचा दर वाढवावा, या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांच्या नावे असलेले निवेदन कारखान्याचे ऊस व्यवस्थपकांकडे सुपूर्द करण्यात आले.

भाली साखर कारखान्यामधील मशीनची तातडीने देखभाल, दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. किसान सभेचे सरचिटणीस सुमित दलाल म्हणाले की, कारखान्याशी संबंधित शेतकऱ्यांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीनंतर कारखान्याच्या कार्यकारी संचालक अनुपस्थित असल्याचे दिसले. त्यामुळे ऊस व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. आगामी काळात ऊस दरवाढीच्या प्रश्नावर राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र करू असा निर्णय घेण्यात आला. यावेळी ऊस उत्पादक संघाचे निमंत्रक बलवान सिंग, बबलू ऊन, अशोक मदिना, सज्जन बागडी, सुनील मलिक, रामबीर, जसबीर, हरकिशन मदोधी, धर्मपाल डांगी, संदीप मलिक, ईश्वर टिटोळी, सतीश टिटोळी, यशवीर टिटोळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here