हरियाणा : तांत्रिक अडचणीचा साखर कारखान्याच्या गाळपावर परिणाम

पलवल : चालू हंगामात गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर लगेच आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे राज्य सरकारच्या मालकीच्या सहकारी साखर कारखान्याच्या गाळपावर परिणाम झाला आहे. कारखान्याच्या गळीत हंगामास २६ ऑक्टोबर रोजी प्रारंभ झाला होता. कारखाना आपल्या क्षमतेच्या एक तृतीयांशहून कमी गाळप करीत आहे.

याबाबत Tribuneindia.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कारखान्याच्या गळीत हंगामात अडचणी आल्या आहेत. काही दिवसांपासूनच ऊस गाळपास सुरवात झाली होती. तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना ऊस पुरवठा करण्यात अडथळे आले आहेत. कारखाना चार तास बंद राहीला.

हरियाणात गळीत हंगामाला प्रारंभ झाला आहे. साखर कारखाने या हंगामात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here