ऊस दर 400 रुपये प्रति क्विंटल देण्याची मागणी

उसाचा दर वाढवण्याच्या मागणीसाठी बुधवारी शेतकरी आहुलाना साखर कारखाना परिसरात एकत्र आले. शेतकर्‍यांनी उस दर 400 रुपये प्रति क्विंटल देण्याची मागणी करुन मुख्यमंत्र्यांच्या नावे एक निवेदन कारखान्याचे एमडी सुभाष चंद्र यांना दिले. उसाचा दर वाढवला नाही तर शेतकर्‍यांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला. हे निवेदन भाकियू चे कथुरा ब्लॉक प्रधान कृष्ण मलिक यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

ते म्हणाले, सरकारने उसाचा दर 340 रुपये प्रति क्विंटल निश्‍चित केला आहे. हा दर खूपच कमी आहे. उस तोडणी आणि इतर कामे ही मजुरांकडून करुन घ्यावी लागतात. मजूर दरवर्षी आपली मजुरी वाढवतात. खर्च अधिक आणि दर कमी असल्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे अर्थिक नुकसान होत आहे. शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार, उसाच्या दरात गेल्या पाच वर्षात केवळ तीस रुपयांची वाढ झाली आहे. उसाच्या दरात वाढ होण्याच्या मागणीसाठी कैथल च्या शेतकर्‍यांनी कारखान्याला उस घालणे बंद केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ बुधवारी उसाचा दर वाढवण्यासाठी कारखान्याचे एमडी सुभाष चंद्र यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी संदीप रुखी, भोला छिछडाना, अशोक मुंडलाना, मेनपाल, दीपक न्यात, कृष्ण रुखी, संजीव, धर्मबीर, अनिल, राजबिर, बिजेंद्र, सोमबीर आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here