हरियाणा शुगरफेडच्या अधिकाऱ्यांकडून नारायणगड कारखान्याची पाहणी

अंबाला : नारायणगड साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्याबाबत राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. हरियाणा स्टेट फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लिमिटेडचे (शुगरफेड) अधिकारी राज्य सरकारच्या निर्देशानंतर नारायणगड साखर कारखान्यात पोहोचले. त्यांनी तेथील वस्तू स्थितीची पाहणी केली.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, हरियाणा शुगरफेडचे तांत्रिक सल्लागार (टीए) सलुजा यांना नारायणगड साखर कारखान्याच्या आपल्या पाहणीत आढळले की, जर कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन समाप्त केले आणि कारखान्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू केले तरी कारखान्याचे काम सुरू व्हायला जवळपास ६० दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. सलुजा यांच्यासोबत शेतकरी आणि साखर कारखाना कर्मचारी संघाचे उपस्थित होते. त्यावेळी शेतकरी नेत्यांनी सांगितले की, राज्य सरकारने एका उच्चस्तरीय बैठकीत त्यांना नारायणगड साखर कारखान्याच्या तांत्रिक स्थितीबाबत विचारणा केली गेली होती. कारखाना सुरू केला जाऊ शकतो की नाही याबाबत विचारणा केली गेली होती. त्यानंतर सलूजा यांनी कारखान्याची पाहणी करून अहवाल देण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here