रुडकी : एकीकडे पावसामुळे लोकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे तर दुसरीकडे बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. जोरदार वारे आणि पावसामुळे गहू, मोहरी आदी पिकांचे मोठे नुकसान होईल. सध्या मोहरी पिकाची गतीने कापणी सुरू आहे. त्यासह आंब्याची झाडे फळांनी बहरली आहेत. यासोबतच गव्हाच्या पिकाचे दाणेची चांगले भरले आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी नरेंद्र सिंह यांनी सांगितले की, मोहरीचे पिक अद्याप शेतातच आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दर पुढील काही दिवसांत जोरदार वारे वाहिले अथवा पाऊस कोसळल्यास पिकाला धोका आहे. ऊस पिकाचेही पावसाने चांगलेच नुकसान केले आहे.