महाराष्ट्रमध्ये मोठ्या पावसामुळे ऊस गाळपामध्ये होणार विलंब

पुणे: अलीकडेच महाराष्ट्राचा ऊस पट्टा समजल्या जाणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्राच्या अनेक भागात मोठा पाउस झाला, ऊसाच्या शेतांमध्ये पाणी भरले आहे. यामुळे साखर कारखान्यांकडून ऊस गाळपामध्ये उशिर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव शुगर फॅक्टरीज फेडरेशन चे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले की, पावसाने ऊसाच्या पीकाचे अधिक नुकसान झालेले नाही. पण कारखान्यांच्या आसपास रस्ते आणि इतर मूलभूत घटकांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे गाळपात उशिर होईल . सामान्य स्थिती झाल्यानंतर ऊस गाळप सुरु होईल. गेल्या आठवड्यात, मोठा पाउस आणि पूराने पुणे, औरंगाबाद आणि कोकण भागात अनेक लाख हेक्टर पीकांचे नुकसान झाले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here