नवी दिल्लीः देशातील काही राज्यांमध्ये जोरदार पावसाने विध्वंस घडवला आहे. उत्तर भारतातील काही राज्यांसह उत्तराखंड, केरळ या राज्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत या दोन्ही राज्यांत आतापर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक बेपत्ता आहेत. बचाव मोहीम पूर्ण झाल्यानंतर मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.
उत्तराखंडमध्ये आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक फटका कुमाऊ भागाला बसला आहे. येथे ३६ जणांचा पुराशी संबंधीत घटनांत बळी गेला. सतत सुरू राहिलेल्या पावसाने शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक लोक अडकले आहेत. तर अल्मोडामधील काठगोदाम आणि दिल्लीला जोडणाऱ्या रेल्वेमार्गाचा एक भागही पुरात वाहून गेला.
याशिवाय दक्षिण भारतातील केरळ राज्यातही जोरदार पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ३५ जणांचा बळी गेला आहे. मृतांची संख्या अधिक असू शकेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्कर आणि नौसेनेकडून बचावकार्य सुरूच आहे. नैनिताल परिसरात मंगळवारी रात्री विविध सात घटनांमध्ये ३० जणांचा मृत्यू झाला. ढगफूटी झाल्याने जोरदार पाऊस कोसळला. त्यानंतर भूस्खलनाच्या घटनांनी स्थानिकांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link