हंगामात किच्छा कारखान्याचा साखर उताऱ्यात उच्चांक

किच्छा : गेल्या गळीत हंगाात किच्छा साखर कंपनीने १०.७३ टक्के साखर उतारा मिळवून उच्चांक निर्माण केला आहे. या कालावधीत साखर कारखान्याने ४ लाख २३ हजार ४५० क्विंटल साखर उत्पादन केले.
गेल्या गळीत हंगामात साखर कारखाना प्रशासनाने ५५ लाख क्विंटल साखर ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ३९.७४ लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले होते. या कालावधीत कारखान्याने उच्चांकी १०.७३ टक्के साखर उतारा मिळवला आहे.

चालू हंगामात साखर उताऱ्यात किच्छा साखर कारखाना राज्यात पहिल्या क्रमांकावर राहीला. कारखान्याच्या ६२ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका उतारा मिळाला आहे. कार्यकारी अध्यक्ष रुची मोहन रयाल यांनी सांगितले की, चालू हंगामात कारखान्याने चांगल्या गुणवत्तेच्या साखरेचे उत्पादन केले. रयाल यांनी सांगितले की, आगामी हंगामात कारखान्याच्या बॉयलरमधील जागा वाढविण्यासह साखर उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येत आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here