गेल्या 10 वर्षाच्या तुलनेत कारखाने या हंगामात करणार विक्रीमी साखर निर्यात

कोरोना वायरस महामारी असूनही भारत या हंगामात गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत सर्वात अधिक साखर निर्यात करत आहे. अहवालानुसार, जूनच्या शेवटपर्यंत देशाने ईराण, इंडोनेशिया आणि मलेशिया सारख्या देंशांबराबेर 49 लाख टन साखर निर्यात केली आहे. जी भारतीय साखरेसाठी सर्वात लोकप्रिय बाजाराच्या रुपात समोर येत आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशन चे महानिदेशक अविनाश वर्मा म्हणाले, पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी 4-5 लाख टन साखर निर्यात करण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, पुढच्या साखर हंगामाच्या सुरुवातीपूर्वी एकूण निर्यात 60 लाख टन लक्ष्याच्या तुलनेत 53-54 लाख टनामध्ये होवू शकते. ते म्हणाले, लक्ष्य पेक्षा कमी निर्यातीसाठी बहुसंख्य काही कारखान्यांच्या निर्यातीमध्ये अनिच्छा हे प्रमुख कारण बनले.

साखर निर्यात आपल्या लक्ष्यापेक्षा कमी असूनही देशामध्ये या हंगामात सर्वात अधिक निर्यातीचा विक्रम केला जाईल. 2018-19 मध्ये देशातून 38 लाख टन साखरेची आयात करण्यात आली होती. यावर्षी भारतीय साखरेला इराण, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका आणि अफगाणिस्तान मध्ये चांगली मागणी आहे. 2019-20 हंगामाची सुरुवात अतिरिक्त साखरेच्या स्टॉकपासून झाली होती. कारखान्यांनी शेतकर्‍यांना थकबाकी भागवण्यासाठी तरलता उत्पन्न करण्यामध्ये मदत करण्यासाठी केंद्र सरकारने कारखान्यांना आपला स्टॉक निर्यात करण्यासाठी 10,448 रुपये प्रति टन अनुदानाची घोषणा केली होती.

ते म्हणाले, पुढच्या हंगामासाठी 305 लाख टन साखरेच्या उत्पादनाचे अनुमान आहे. आणि त्यासाठी आम्ही निर्यातीसाठी 60-70 लाख टन कोट्याची शक्यता आहे. थायलंड चे साखर उत्पादन पुढच्या हंगामामध्ये 80 लाख टन होण्याची शक्यता आहे. तर त्याची सामान्य उत्पादन क्षमता 140 लाख टन आहे. भारतीय मिलर्स त्या बाजारांमध्ये पुन्हा सेवा देवू शकतात, ज्या साधारणपणे थायलंड कडून पूर्ण केल्या जात आहेत.

निर्यात/साखर (लाख़ टनामध्ये) : 2009-10 (2.35), 2010-11 (26), 2011-12 (29.92), 2012-13(3.48), 2013-14 (21.27), 2014-15 (10.94), 2015-16 (16.56), 2016-17 (0.46), 2017-18 (4.46), 2018-19 (38).

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here