भोपाल : हिंदुस्तान ग्रीन एनर्जी मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी तहसीलमधील गुडरुघाट गावात ४०० केएलपीडी क्षमतेचा धान्यावर आधारित इथेनॉल प्लांट स्थापन करण्याची तयारी करीत आहे. या प्लांटचे काम मार्च २०२३ पर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. कंपनीने एप्रिल २०२५ पर्यंत या प्लांटचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
Projecttoday मध्ये प्रकाशित वृत्तानुसार कंपनीच्या या योजनेसाठी ३४.६५ एकर जमीन मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये दोन टप्प्यात काम केले जाणार आहे. या योजनेमध्ये १४ मेगावॅट सह वीज निर्मिती प्लांटच्या स्थापनेचाही समावेश आहे. हिंदूस्थान ग्रीन एनर्जीच्या या प्लांटसाठी पर्यावरणीय मंजुरीही मिळाली आहे.