सात दिवसांमध्ये समस्या न सोडवल्यास रजपुरा कारखान्यावर करणार धरणे आंदोलन

चन्दौसी : ऊस थकबाकी सह शेतकर्‍यांच्या विविध समस्यांचे निराकरण न झाल्याने भारतीय किसान यूनियन (भाकियू) च्या पदाधिकार्‍यांनी रोष व्यक्त केला. दरम्यान पदाधिकार्‍यांनी जिल्हा ऊस अधिकारी यांना निवेदन देवून लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली. तसेच सात दिवसात समस्या सोडवल्या गेल्या नाहीत तर रजपुरा कारखान्यावर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला.

शुक्रवारी भाकियू चे जिल्हाध्यक्ष शंकर सिंह यादव यांच्या सूचनेवरुन भाकियू कार्यकर्ता साखर कारखान्यांवर ऊस थकबाकी भागवणे आणि शेतकर्‍यांच्या विविध समस्यांना घेवून जिल्हा ऊस अधिकारी कार्यालयात आले. ऊस अधिकार्‍यांना भेटून कार्यकर्त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील तीन ऊस कारखान्यांवर शेतकर्‍यांचे 253 करोड रुपये देय आहेत. कोरोना मुळे शेतकर्‍यांना उदरनिर्वाहासाठी साखर कारखान्यांकडून त्यांचे देय दिले जावे. कार्यकर्त्यांनी सांगितले की, डीएसएम शुगर मिल रजपुरा कडून प्रेरणा मोठ्या क्षेत्रफळात शरदकालीन ऊस लागवड केली होती. आता कारखाने त्याला पेडी ऐवजी रोपाची नोंद करण्यावर अडकले आहेत. कारखान्याकडून स्थानिक शेतकर्‍यांऐवजी अलीगढ, बुलंदशहर आदी क्षेत्रांतील शेतकर्‍यांचा सर्वे केला जात आहे. या सर्व समस्यांचे 7 दिवसात निराकरण केले जावे. जर असे झ्राले नाही तर नाइलाजाने डीएसएम शुगर मिल च्या गेटवर धरणे आंदोेलन करावे लागेल. यावेळी मुनेंद्र सिंह, विजेंद्र सिंह, जसवीर सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here