बाजपूर : साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांना फिटमेंट दिलेली नाही. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित आहे. यांसह विविध चार मागण्यांबाबत बाजपूर तथा जसपूर नादेही साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने डेहराडूनमध्ये समाजकल्याण मंत्री यशपाल आर्य आणि ऊस मंत्री स्वामी यतीश्वरानंद यांची भेट घेतली. या अडचणी सोडविण्याबाबत योग्य ते निर्देश दिले जातील असे आश्वासन यावेळी ऊस मंत्री यतीश्वरानंद यांनी दिले.
साखर कारखान्याच्या पाच संघटनांच्यावतीने स्थापन झालेल्या संयुक्त मोर्चाचे अध्यक्ष विरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने रविवारी डेहराडून येथे मंत्री यशपाल आर्य यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली. यशपाल आर्य यांनी कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर ऊस मंत्री स्वामी यतीश्वरानंद यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी ऊस मंत्र्यांची भेट घेतली. ऊस मंत्री यतीश्वरानंद यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांसाठी सरकार सदैव तत्पर आहे. त्यांच्या सर्व मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी वीरेंद्र सिंह, राजेंद्र चौहान, विजय शर्मा, नरेंद्र चौधरी, अभिषेक तिवारी आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link