कोल्हापूरमध्ये साखर उतारा ११ टक्क्यांजवळ

महाराष्ट्रातील साखर उत्पादनाची गती वाढली आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये २६ डिसेंबर २०२१ अखेर महाराष्ट्रात एकूण १८८ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९५ सहकारी तसेच ९३ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ४३१.०६ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ४१३.८३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.६० टक्के आहे.

कोल्हापूर विभागातील साखर उतारा ११ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. राज्यात सर्वाधिक साखर उत्पादनही कोल्हापूर विभागातच झाले आहे. कोल्हापूर विभागात १०५.२२ लाख टन ऊस गाळप झाले आहे. तर ११४.७७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. येथील साखर उतारा १०.९१ टक्के आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक ४३ साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार २६ डिसेंबर २०२१पर्यंत सोलापूर विभागात ९१.७९ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले असून ७८.७६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ८.५८ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here