महाराष्ट्रामध्ये रिकवरी दर 92 टक्के, पूर्वीच्या तुलनेत रुग्णांमध्ये घट

मुंबई: महाराष्ट्रामध्ये गेल्या 24 तासामध्ये कोरोनाचे 4,907 रुग्ण समोर आले आणि 125 रुग्णांचा मृत्यु झाला. तर 9,164 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य विभागाच्यानुसार, राज्यामध्ये एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 17,31,833 पर्यंत पोचला आहे. ज्यामध्ये 88,070 रुग्ण सक्रीय आहेत. तर 15,97,255 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यामध्ये आतायर्पंत या महामारीमुळे 45,560 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. नगर निगम, ग्रेटर मुंबईच्या अनुसार राजधानी मुंबईमध्ये एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 2,66,746 वर पोचली आहे. आतापर्यंत 2,39,800 रुग्ण बरे झाले आहेत. तर 12,674 रुग्ण सक्रीय आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण 10,503 लोकांचा या महामारीमुळे मृत्यु झाला आहे.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here