मुरादाबाद : सरकारने शेतकऱ्यांना जून महिन्यात ८० टक्के ऊस बिले अदा करण्यात आल्याचा दावा केला आहे. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जून महिन्याच्या तुलनेत यंदा जून २०२१ मध्ये शेतकऱ्यांना उच्चांकी ऊस बिले अदा केली आहेत.
जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अजय सिंह यांनी सांगितले की, सरकारच्या धोरणांचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. गेल्या वर्षी जून महिन्याच्या तुलनेत यंदा जून २०२१ मध्ये शेतकऱ्यांना उसापोटी दिलेले पैसे ७५ टक्के आहेत. मुरादाबादचे चार साखर कारखाने शेतकऱ्यांना पैसे अदा करीत आहेत. दिवाण साखर कारखान्याकडून कमी पैसे दिले गेले आहेत. गेल्या सहा वर्षात थकबाकीसह पैसे देण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे.
दरम्यान, अमरौला बाजार समितीमधील गहू विक्री केंद्रावर शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्यानंतर उप जिल्हाधिकारी मांगे राम चौहान यांनी गहू विक्री केंद्रांचा आढावा घेतला. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी परत जाता कामा नयेत असे निर्देश त्यांनी दिले. अधिकारी फोन उचलत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link