नेपाळमध्ये उस थकबाकी भागवण्याचा मुद्दा गरम, शेतकरी राजधानीमध्ये करणार मोठे आंदोंलन

काठमांडू: साखर कारखान्यांकडून बर्‍याच काळापासून थकबाकी भागवली जात नसल्याने उस शेतकर्‍यांनी रविवारपासुन काठमांडूच्या मैटीघर मंडळामध्ये विरोधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उस शेतकर्‍यांच्या अ‍ॅक्शन कमिटीचे सदस्य राकेश मिश्रा यांनी सांगितले की, शुक्रवारपयंंत जर साखर कारखाने थकबाकी भागवू शकले नाहीत, तर त्यांना नाइलाजाने आंदोलन करावे लागेल. मिश्रा यांनी सांगितले की, कारखान्याकडून शेतकर्‍यांना देण्यात आलेल्या प्रस्तावित तारीखेपर्यंत थकबाकी भागवली जाईल. त्यांनी इशारा दिला की, शेतकर्‍यांना पैसे मिळाले नाहीत, तर ते प्रधानमंत्री यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करतील. उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्रालयाच्या रेकॉर्डनुसार, शेतकर्‍यांना आतापर्यंत श्री राम साखर कारखाना, अन्नपूर्णा साखर कारखाना, इंदिरा साखर कारखाना आणि लुंबिनी साखर कारखान्याकडून शेतकर्‍यांचे 481 मिलियन रुपये देय आहेत. यावर्षीसाठी गाळप हंगाम सुरु झाला आहे, पण या कारखान्यांनी गेल्या सहा वर्षांपासूनचे देय दिलेले नाही.

श्रीराम साखरकारखान्यावर शेतकर्‍यांचे 350 मिलियन रुपये देय आहेत. याप्रकारे अन्नपूर्णा कारखान्यावर 170 मिलियन, लुंबिनी वर 84.1 मिलियन आणि इंदिरा कारखान्यावर 47 मिलियन रुपये देय आहेत.

गेल्या वर्षीही शेतकर्‍यांनी राजधानी मध्ये धरणे आंदालन केले होते. घटनेनंतर, सरकारने शेतकर्‍यांना प्रत्येक वर्षी डिसेंबर च्या पहिल्या आठवड्याच्या आत थकबाकी भागवण्याचे आश्‍वासन दिले होते. शेतकर्‍यांना सरकारच्या आश्‍वासनानंतरही थकबाकी मिळालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here