सहारनपूरमध्ये शेतकऱ्याने एक हेक्टरमध्ये घेतले १५०६ क्विंटल उसाचे उत्पादन

सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये प्रगतशील शेतकऱ्याने प्रती हेक्टर १५०६ क्विंटल उसाचे उत्पादन घेऊन विभागीय ऊस स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. अधिकृत सुत्रांनी सांगितले की, विभागीय ऊस स्पर्धेत ४९ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. ऊस विभागातील अधिकाऱ्यांनी ४२ शेतकऱ्यांचा ऊस तोडून त्याच्या उत्पादकतेची मोजणी केली. यामध्ये महेशपूर गावातील शेतकरी सतीश यांनी हेक्टरी १५०६.५० क्विंटल ऊस उत्पादन घेऊन पहिला क्रमांक मिळवला.

ऊस आयुक्त डॉ. दिनेश्वर मिश्र यांनी सांगितले की, महेशपूर गावच्याच शेतकरी अमित कुमार यांनी १४९८.५० क्विंटल प्रती हेक्टर ऊस उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर अलीपुरा गावातील सेठपाल यांनी हेक्टरी १४८८.५० क्विंटल ऊस उत्पादन घेऊन तिसरा क्रमांक मिळवला. युनिवार्तामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या तिन्ही शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. विभागीय स्पर्धेत सहारनपूर जिल्ह्यानेच तिन्ही क्रमांक मिळवले आहेत. तीस शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. ऊस विभागाने १४ शेतकऱ्यांकडील ऊस तोडणी करून उत्पादकतेचे मोजमाप केले. २०२०-२१ या वर्षातील ही स्पर्धा होतील. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे प्रयत्न कृषी विभागाकडून नेहमीच केले जातात असेल ऊस आयुक्त डॉ. मिश्र यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here