उत्तर प्रदेशामध्ये ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरु करण्याची योजना

लखनऊ, उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरुवात करण्याची योंजना बनवली आहे . उत्तर प्रदेश देशातील मोठे साखर आणि ऊस उत्पादक राज्य आहे. गेल्या 2019-20 च्या गाळप हंगामात 12.65 दशलक्ष मेट्रिक टन साखर उत्पादन केले होते. हे प्रमाण भारताच्या एकूण 27.2 दशलक्ष टन साखर उत्पादनाच्या 45 टक्क्यापेक्षा अधिक आहे.

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी आपल्या सरकारी निवास स्थानी भारतीय किसान यूनियन बरोबरच्या बैठक़ीदरम्यान सांगितले की, राज्य सरकार ऊस शेतकर्‍यांच्या हितांसाठी खूपच संवेदनशील आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली की, पश्‍चिमी आणि पूर्वी यूपी मधील साखर कारखाने क्रमश: 15 आणि 25 ऑक्टोबरपासून परिचालन सुरु करतील. वेळेवर गाळप सुरु झाल्यास शेतकर्‍यांना गव्हाच्या पेरणीसाठी पुरेसा वेळ मिळेल. ज्यामुळे कृषी उत्पन्नात सुधारणा होईल.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here