उत्तर प्रदेशामद्ये साखर उत्पादनात झाली वाढ

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशामध्ये गेल्या हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत झालेल्या साखर उत्पादनात वाढ दिसून येत आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) च्या नव्या अहवालानुसार, उत्तर प्रदशामध्ये 30 नोव्हेंबर 2020 पर्यत 111 साखर कारखान्यांनी उस गाळप करुन 12.65 लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2019 पर्यंत समान संख्येमध्ये कारखान्यांनी गाळप करुन 11.46 लाख टन साखर उत्पादन केले होते.

30 नोव्हेंबर, 2020 पर्यंत देशामध्ये 408 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु आहे आणि 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत 309 साखर कारखान्यांद्वारा उत्पादित 20.72 लाख टनाच्या तुलनेत 2020-21 हंगामामध्ये 42.90 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामाच्या उत्पादनाच्या तुलनेत 22.18 लाख टन साखर उत्पादन अधिक आहे.

अहवालानुसार, इथेनॉल च्या उत्पादनासाठी जवळपास 28 कारखाने सध्या बी हैवी मोलासेस/उसाच्या रसाला डाइवर्ट करत आहेत, तर गेल्या हंगामाच्या याच अवधी दरम्यान, जवळपास 18-20 साखर कारखाने बी हैवी मोलासेस/उसाच्या रसाला डाइवर्ट करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here