उसाची थकीत बिले न दिल्यास 27 जुलैपासून बेमुदत आंदोलन: रघुनाथदादा पाटील

पुणे : उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळावा, उसाची थकीत बिले आणि कामगारांचे थकीत वेतन तत्काळ द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले, मागण्या मान्य न झाल्यास 27 जुलै २०२३ पासून साखर आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, ऊस नियंत्रण आदेशाप्रमाणे गाळपास ऊस गेल्यापासून १४ दिवसात एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र असे असले तरी राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्याप एफआरपीनुसार १०० टक्के ऊस बिले दिलेली नाहीत. साखर कामगारांचे वेतनही थकीत आहे. राज्य शासन आणि साखर आयुक कार्यालय यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तत्काळ पुढाकार घ्यावा, अन्यथा आंदोलन अटळ असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here