बेमुदत उपोषण: बंद रैयाम साखर कारखाना सुरू करण्याची मागणी

केवटी : युवा संघर्ष मोर्चाच्या केवटी शाखेने आपल्या विविध सहा मागण्यांसाठी रैयाम साखर कारखान्यासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. तीन कार्यकर्त्यांनी दिवंगत श्रीनारायण सिंह स्मारकासमोर हे आंदोलन सुरू केले आहे.
पंचायत समितीचे माजी सदस्य राम प्रकाश पासवान, जमहिर पासवान आणि महाराज दास यांनी सांगितले की, अकरा वर्षांपूर्वी प्रदीप चौधरी यांच्यासोबत साखर कारखान्याने करार केला होता.

मात्र, कारखान्याच्या पुर्ननिर्मितीवेळी चौधरी यांच्या कंपनीने रैयाम कारखान्याची जुनी यंत्रसामुग्री आणि इमारती विकून लूट केली आहे. त्यामुळे सरकारने करार रद्द करून अन्य पर्याय पडताळण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here