भारत साखरेचा जगातील सर्वात मोठा उत्पादक, द्वितीय क्रमांकाचा निर्यातदार

नवी दिल्ली : भारताने २०२२-२३ मध्ये ब्राझीलपेक्षा अधिक साखर उत्पादन करून जगातील सर्वात मोठा उत्पादन देश बनण्याचा बहुमान मिळवला आहे असा दावा केंद्र सरकारने केला आहे. तर साखर निर्यातीत देश द्वितीय क्रमांकावर आहे.

केंद्रीय खाद्य विभागाचे संयुक्त सचिव सुबोध सिंह यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, देशातील साखरेचे उत्पादन वाढले आहे आणि साखर निर्यातही वाढली आहे. साखर हंगाम २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या काळात अनुक्रमे जवळपास ६.२ एलएमटी, ३८ एमएलटी आणि ५९.६० एमएलटी साखर निर्यात झाली होती. साखर हंगाम २०२१-२२ मध्ये ९० एमएलटी साखर निर्यातीचे करार झाले आहेत. साखर कारखान्यांनी ८२ एलएमटी साखर निर्यातीसाठी रवाना झाली आहे. आणि जवळपास ७८ एमएलटी साखर निर्यात करण्यात आली आहे. सध्याच्या हंगाम २०२१-२२ मध्ये निर्यातीत ऐतिहासिक तेजी दिसून आली आहे.

ते म्हणाले की, जवळपास ८० टक्के साखर उत्पादन महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये होते. नर्मदेचे दक्षिणेतील दोन राज्ये बंदराच्या जवळ आहेत. या राज्यांतून अधिक निर्यात होते. यापूर्वी सरकारने साखर हंगाम २०२१-२२ (ऑक्टोबर-सप्टेंबर) या दरम्यान, देशांतर्गत उपलब्धता आणि साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी १ जून ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत साखर निर्यात १०० एलएमटीपर्यंत मर्यादीत करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here