साखर निर्यातीचे उद्दिष्ट भारत या हंगामात गमवण्याची शक्यता

नवी दिल्ली :
बाजारात होणारी घसरण कमी होण्याची आपेक्षा असलेल्या 5 दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीच्या उद्दिष्टाला भारत या हंगामात गमावण्याची शक्यता आहे. चालू हंगामात 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या दोन महिन्यांच्या अवधीत केवळ 3.4 दशलक्ष टनांची विक्री झाली आहे.

या हंगामात आणखी एक लाख टन विक्रीची सुविधा दिली जावू शकते आणि ती सरकारने ठरविलेल्या एकूण उद्दिष्टाच्या 70 टक्के आहे. उच्च उत्पादन खर्च आणि साखरेच्या कमी झालेल्या जागतिक किंमती यांनी निर्यातीवर मर्यादा आणली.
सरकारने देवू केलेली प्रोत्साहनपर किंमतही जागतिक किंमतीशी जुळली नाही, असे एका उद्योगतज्ञाने सांगितले आहे.
साखर कारखानदारीत निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारने यंदा प्रोत्सहन दिले आहे, ज्यामध्ये बंदरांच्या अंतरानुसार साखर कारखान्यांना एक हजार टन ते 3 हजार टनांच्या वाहतुक अनुदानाचा समावेश होता. येत्या हंगामात जागतिक पुरवठा कमी होण्याची शक्यता असून या उद्योगात 7 दशलक्ष टन साखर निर्यात करण्याचे उद्दिष्ट आहे.

चालू हंगामात निव्वळ जगातील 20 दशलक्ष टन एवढी वाढ झाली आहे. शिवाय दरही कमकुवत आहेत आणि आपण 5 दशलक्ष टन निर्यात करण्यास सक्षम नाही. परंतु पुढच्या हंगामात निर्यात किफायतशीर होण्यासाठी मागणी आणि पुरवठा यामध्येे 4 दशलक्ष टनाचे अंतर असण्याची शक्यता आहे, असे इस्माचे महासंचालक अबिनाश वर्मा यांनी सांगितले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here