भारताकडून २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रण उद्दिष्टपूर्ती शक्य

नवी दिल्ली : भारत २०२५ मध्ये इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या वाटेवर आहे, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली. एका बैठकीत बोलताना इस्माचे महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले की, देशात सध्याच्या ८.२ टक्क्यांच्या इथेनॉल मिश्रणावरून २०२५ पर्यंतच्या २० टक्क्यांपर्यंतचे इथेनॉल उत्पादन करणे शक्य होणार आहे.

२०२१ मध्ये देशातील इथेनॉल उत्पादन क्षमता ६ बिलियन लिटरची आहे. यामध्ये रस, शिरा यावर आधारित ५ बिलियन युनिट लिटरचा समावेश आहे. वर्मा यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारांकडून अनेक प्रोत्साहन योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून इथेनॉल उत्पादन युनिट सुरू करण्याबाबत उत्सुकता दर्शविण्यात आली आहे. केंद्र सरकारकडे सुमारे ८०० योजनांची नोंदणी करण्यात आली आहे. काही साखर कंपन्या दुहेरी इथेनॉल युनिट स्थापन करीत आहेत. ऊस तसेच मोलॅसीससह मक्का आणि धान्याचा वापर करून इथेनॉल निर्मिती केली जाईल. त्यामुळे २०२५ पर्यंत, जवळपास १० बिलियन लिटर इथेनॉलचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी पुरेशी क्षमता असेल
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here