टीव्हीएस मोटर कंपनीने सुरु केली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल

चेंन्नई : चेन्नईस्थित टीव्हीएस मोटर कंपनीने भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल सुरू केली असून सरकार पर्यायी इंधन, प्रदूषण आणि आयात बिल कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा प्रचार करीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यामध्ये भारतातील काही उस उत्पादक राज्यांमध्ये ही प्रणाली प्रक्षेपित केली जाईल. काही राज्यांमध्ये साखर कारखान्यांसह टाय अपचाही समावेश आहे.

जैव इथेनॉल बायोमासमधून तयार होते, ज्यामध्ये साखर आधारित घटक साखर बीट आणि गोड ज्वारी असतात. 2018 मध्ये सरकारने बायोफ्यूल्सवर आणलेले राष्ट्रीय धोरण म्हणजेच 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथॅनॉल मिश्रण करण्याबाबत प्रसरकार प्रयत्नशील असणार आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रसाद म्हणाले, 2012-13 मध्ये 0.67 टक्के इथेनॉलच्या तुलनेत, भारत सध्या 6.2 टक्के इथेनॉल निर्मिती पर्यंत पोचला आहे. शेतीतील अवशेषाचे इथॅनॉलमध्ये रुपांतरित करून पीकाला लागणारी आग कमी करण्यात मदत करेल.

ब्राझिलनंतर भारत जगातील सर्वात मोठा उस उत्पादक देश आहे. सन 2019 मध्ये भारताचे साखर उत्पादन 28.2 दशलक्ष टन एवढे आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here